बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते.
त्यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले असून, केंद्र सरकारने पुलाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश आयआरबी कंपनीला दिले आहेत.
ज्या वेळी हा पूल खचून वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती, त्या वेळी डॉ. प्रीतम मुंडे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला बोलावून रस्त्याची दुरुस्ती करायला लावली व वाहतूक पूर्वपदावर आणली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. एवढेच नव्हे, तर पुलाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेशच दिल्लीमधून काढले. हे काम त्यांनी केल्याबद्दल शहरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.